अखेर वाघिणीला पकडण्यात वन विभागाला यश ; तीन दिवसांपूर्वी महिलेला मारण्याचा वाघिणीवर आरोप

0
498

गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभाग वडसा अंतर्गत आरमोरी तालुक्यातील रामाळा परिसरात मुख्यालयापासुन अवघ्या 5 किमी अंतरावर वाघीनीला वनविभागाने 23 ऑक्टोबर ला सकाळच्या सुमारास जेरबंद करण्यात आले..
आरमोरी परिसरात वाघांचा संचार असुन तिन दिवसांपूर्वी रामाळा परिसरात वाघाने ताराबाई धोडरे नामक 60 वर्षीय महिलेला टी-13 वाघिनेने ठार केल्याची घटना घडलेली होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांनी वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. वनविभागाने त्याच दिवसांपासून वाघीनीच्या हालचाली वर पाळत ठेवली होती.
त्या करिता कॅमेरा ट्रॅप लावुन अवघ्या तीन दिवसात वाघिणीला वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रवि , मधिल सव्हें क्रमांक 12/1 मध्ये जेरबंद केले. वाघीनीला आता गोरेवाडा TTC इथे नेण्यात येणार असून वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी एकच निश्वास सोडला आहे.


“मात्र जंगल आहे तर तिथे वाघ राहणारच वाघांचे घटते अधिवास आणि नवीन अधिवासाच्या शोधात चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, या चारही जिल्ह्यातील जंगलात, ताडोबा , करांडला किंवा नागझिरा या व्याघ्र प्रकल्प परिसरातील परिवारापासून दूर झालेले नवीन वाघ हे नवीन अधिवास शोधण्याच्या प्रयत्नात इतरत्र भटकत असतात आणि जिथे त्यांना मुबलक जागा मिळते त्या ठिकाणी जाऊन ते स्थावर होतात. मात्र जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर नागरिकाकडून व लोकप्रतिनिधींकडून त्या वाघाला किंवा वाघिणीला जोरबंद करण्याची मागणी केली जाते आणि त्या दबावात येऊन वन विभागाला नाईलाजाने परिसरातील संबंधित वाघ, वाघीण ,बिबट ,अस्वल सारख्या प्राण्यांना पकडून स्थानांतरित करावे लागते. मात्र ती रिकामी जागा झालेली पोकळी पुन्हा दुसरा कोणता तरी वाघ त्या जागेवर येऊन भरून काढेलच आणि संघर्ष हा अविरतपणे चालूच राहील. मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी सतत ‘वाघ पकडा, वाघ पकडा!’ असे रेटून धरून वाघांना जोरबंद करून त्यांचे स्थानांतरण करणे हा यावरचा कधीच उपाय असू शकत नाही. तर परिस्थितीची जाण लक्षात ठेवून आपल्याला त्यांच्यासोबत कसे जगता येईल ? आणि मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल ? या गंभीर प्रश्नांकडेही विभागच नाही तर परिसरातील लोक आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून ‘जंगल, वन्यजीव आणि मानव’ हे तिन्ही आप आपल्या ठिकाणी सुरक्षित जगू शकतील.”
– यश कायरकर,अध्यक्ष ‘स्वाब नेचर केअर संस्था.’
या वाघिणीला पकडण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ता.अं.व्या.प्र. चंद्रपुर व शुटर अजय मराठे यांची चमु आरमोरी परिक्षेत्रात बोलाविण्यात आली होती. वाघीनीला जेरबंद
सदरची कार्यवाही एस. रमेशकुमार, वनसंरक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धर्मविर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वडसा, संदिप भारती, सहाय्यक वनसंरक्षक, वडसा वनविभाग, वडसा पवनकुमार जोंग, परिविक्षाधीन (भा.व.से.), वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी, अविनाश मेश्राम, वपअ आरमोरी ( सलग्न), राजेंद्र कुंभोर, क्षेत्र सहाय्यक आरमोरी, अजय उरकुडे, पाटील, साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रकल्प चंद्रपुर मधिल चमु मध्ये दिपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, निकेश शंदे, मनान शेख तसेच गडचिरोली RRT चमु दलातील डॉ. आशिष भोयर, अजय कुकडकर, मकसुद सय्यद, गुणवंत बावनथडे, पंकज फरकडे, निखील बारसागडे व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here