पेरजागड डोंगर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला ‘स्वाब’ संस्थेचे उपक्रम

0
315

चंद्रपूर :  ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरण’ या अंतर्गत आज पुन्हा नेहमीप्रमाणे पेरजागड (सात बहिणी डोंगर) परिसर पायथ्यापासून तर शिखरापर्यंत प्लास्टिक कचरा गोळा करून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.
यावेळी स्वच्छता मित्र म्हणून छत्रपती रामटेके, विनोद लेंडगुरे, जीवेस सयाम, राशिद शेख, विकास लोनबले, महेश बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, हितेश सहारे, प्रशांत सहारे, कृणाल रामटेके, गौरव निकुरे ,स्वप्निल बोधनकर, सुशांत गौरकर, कायरकर या ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य तथा स्वच्छता मित्र सहकार्य केले.
यावेळी पेजागड. डोंगरावर पर्यटनाकरिता आलेल्या महाराष्ट्रभरातील हजारो पर्यटकांना पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक प्रदुषण बद्दल माहिती देऊन “प्लास्टिक कचरा जंगलात, पर्यावरणात कुठेही न फेकता तुम्ही आपल्या सोबत परत घेऊन जाऊन कचरा पेटीत टाका. हीच आम्हाला व पर्यावरणाला तुमची मोलाची मदत ठरेल.” असे सांगून पर्यटकांचे मार्गदर्शन स्वाब संस्थेचे अध्यक्ष ‘यश कायरकर’ यांनी केले.
विशेष म्हणजे स्वाब नेचर केअर संस्थेद्वारे आपल्या परिसरात तील जंगल परिसरात असलेल्या पर्यटन स्थळी जाऊन, रस्त्याने फिरून, आजूबाजूला पसरलेला प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व पर्यावरण प्लास्टिक मुक्त करण्याकरता ही प्लास्टिक मुक्त पर्यावरण’ ही मोहीम सतत श्रमदानातून राबविली जाते.
मात्र एवढे करूनही पर्यटनासाठी जाणारे लोक व पर्यावरण परिसरातून फिरणारे लोक, सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, कुरकुरेच्या पिसव्या आणि खाद्यपदार्थाच्या प्लेट्स, मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला, जंगल परिसरातच फेकून देतात. त्यामुळे ते खाऊन कित्येक मुक्या प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागत असेल, तसेच पर्यावरणात हा प्रदूषण करून पर्यावरण व जंगलाचीही बहुत मोठी हानी होतं असते. यामुळे शासनाने प्रत्यक्षात पर्यावरणामध्ये असलेल्या प्लास्टिक प्रदूषणाबद्दल गांभीर्याने विचार करून, पर्यावरण रक्षणासाठी यावर तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here