प्रकल्पातील कर्मचारी, वसाहतीत व सभोवतालच्या गावातील नागरीकांचा जीव धोक्यात असल्याची गंभीर दखल संपर्क मंत्री मा. प्राजक्त तनपुरें यांनी घेतली
चंद्रपूर जिल्हा प्रशासन, वन विभाग व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क मंत्री तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात येणार
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील वसाहत व प्रकल्पातील सुरक्षा भिंतीच्या आत मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून अनेक मादा वाघीनींने छोट्या शावकांना येथे जन्म दिलेला आहे. यामुळे कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे.
ऊर्जानगर येथे वाघ, बिबट व अस्वल यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून मागील काही महिन्या पासून परिसरात प्राण्यांनी हिंसक रूप घेतले असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सदर परिसरातील आई सोबत फिरणाऱ्या एका ५ वर्षाच्या मुलीला आई समोर बिबट्याने उचलून नेले आणि ठार केल्याची घटना आपल्याला सगड्याना माहीतच आहे. तसेच वसाहतीतील VIP गेस्ट हाऊसच्या आवारात असलेल्या वाघीनीने दुचाकीस्वार कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता, मात्र सोबत असलेल्या इतर कामगारांनी आरडाओरड केल्याने सदर कर्मचारीचे प्राण वाचले मात्र गंभीर जखमी झाला होता.
पूर्वी या परिसरात वाघ, बिबट्या व अस्वल हे फक्त रात्रीच्या वेळी दिसत होते, आता मात्र दिवसाढवळ्या प्रकल्पाच्या आवारात हिंस्र रूप घेत वाघ फिरत आहे. दररोज वाघांचे व्हिडिओ फेसबुक व व्हॅटसअपवर व्हायरल होत असून दुचाकीवर जाणाऱ्या कामगारांवर हल्ला करण्याच्या दृष्टीने धावून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
यापूर्वी देखील या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करा या मागणी करिता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत भेट घेतली असता त्यांनी आपली जबाबदारी झटकत सदर क्षेत्र चं. म. औ. वि. केंद्राचे खाजगी क्षेत्र असून कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही वनविभागाची नाही, ही जबाबदारी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापनाची आहे असे उत्तर दिले.
वन विभाग चंद्रपूर व विज केंद्र व्यवस्थापन यांच्यात या विषयावर मतभेद आहेत. यामुळे प्रकल्पात दिवसरात्र काम करणाऱ्या जवळपास ५ हजार कामगारांसह वसाहतीतील व सभोतालच्या गावातील नागरीकांचा जीव मात्र धोक्यात आलेला आहे.
५ वर्षाच्या मुलीचा जीव गेल्यानंतरही वनविभाग सदर बाब गांभीर्याने घेत नसेल तर यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी शोकांतिका नाही. व म्हणुन भविष्यात देखील एखाद्या कामगारावर किंवा गावातील नागरिकांवर वाघ हल्ला करू शकतो, याची गंभीर दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्हा संपर्क मंत्री मा.ना. प्राजक्त तनपुरे यांनी दि. १८ फेब्रुवारी २०२२ ला मा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, येथे जिल्हा प्रशासन, वन विभाग व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांची संयुक्त बैठक घेण्यात येत आहे.
प्रकल्पातील कर्मचारी, वसाहतीतील व सभोवतालच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने या विषयाची गंभीर दखल ऊर्जा राज्यमंत्री मा. तनपुरे यांच्या तर्फे घेण्यात आल्याबद्दल कर्मचारी व नागरिकांनी आभार मानले.