भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त गावे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील नागरिकांचे सामूहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले.

0
221

भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम, डोंगरद-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. हा तालुका बांबुकरीता प्रसिध्द आहे. तालुक्यातील लोकांचा व्यवसाय शेती असून शेती सोबतच जंगलातील वनउपजावर देखील त्यांचा जीवन अवलंबून आहे. तालुक्यात एकुण 128 गाव असुन त्यापैकी तालुक्यातील अतिदुर्गम व अतिमागास गावे बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी,दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावातील लोकांनी मागील 8 ते 9 वर्षापासून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 अंतर्गत सामुहिक वन हक्क मिळविण्यापासुन वंचित होते आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील देखील होते. परंतु अखेर माननीय जिल्हाधिकारी दिपक सिंगला व माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड तालुक्याचे मा. तहसिलदार अनमोल कांबळे तसेच त्यांच्या अधिनस्त तलाठी वृषभ हीचामी व त्यांच्यासोबत त्यांचे कोतवाल रायधर बाकडा, मारोती दुर्वा, चुक्कु उसेंडी, सत्तु पोदाळी, दिनकर उसेंडी, शंकर मडावी, आकाश काळंगा तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, विशाल चौव्हाण व त्यांचे अधिनस्त क्षेत्रपाल व वनरक्षक यांचे प्रयत्नामुळे या गावातील लोकांना सामुहिक वनहक्क मिळविता आले आहे. सदर सामुमहिक वनहक्क दावे लवकरात लवकर मंजूर होण्याकरीता माननीय जिल्हाधिकारी दिपक सिंगला व माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांनी जिल्हा स्तरीय वनहक्क समितीमार्फत सदर वनहक्क दावे त्वरीत मंजूर होण्याकरीता विशेष प्रयत्न केले. सदरील शिल्लक सामुहिक वनहक्क दावे मंजूर झाल्यामुळे भामरागड तालुका 100 टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका म्हणुन नावारुपास आलेला आहे.

शासनाच्या वतीने मा. जिल्हा स्तरीय वनहक्क समितीकडुन सामुहिक वनहक्क मान्य करण्यात आलेल्या गावातील लोकांना दिनांक 17/02/2021 रोजी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांचे अध्यक्षतेखाली मौजा बिनागुंडा याठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले व त्या शिबीरात मौजा बिनागुंडा,कुव्वाकोडी पेरमलभट्टी,दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा गावातील लोकांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली व त्यांनी मान्यवारांच्या हस्ते सामुहिक वनहक्क पट्टे स्वीकारुन मान्यवारांचे आभार मानले आहे व सामुहिक वनहक्क न मिळाल्यामुळे आजपर्यंत आम्ही बांबु कटाई करु शकत नव्हतो त्यामुळे गावातील लोकांना बाराही महिने कोणतीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या, परंतु सामुहिक वनहक्क मिळाल्यामुळे बांबु कटाई शक्य होईल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून गावाच्या विकासाला चालना मिळेल असे मत गावक-यांनी व्यक्त केले. त्यानंतर माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदल यांनी सामुहिक वनहक्काचे व्यवस्थापन, संरक्षण, पुनर्निर्माण व संवर्धन करण्याकरीता नियोजनबध्द पध्दतीचा अवलंब करावा व ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे. याबाबत लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यासोबतच त्या- त्या गावातील जनता हे आपापल्या गावातील रोड, आरोग्य व शिक्षणाशी संबंधीत समस्य मान्यवारांच्या समोर मांडून ते सोडविण्यास देखील विनंती केली आहे. त्यानुसार मान्यवारांनी बिनागुंडा येथील विनोबा शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्राला भेट देवून समस्या जाणून घेतले व सदरील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here